शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Published: January 12, 2016 4:33 AM

राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.

मुंबई - राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा पुरता धुव्वा उडाला. सेनेला ५७ तर भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावे लागले.राज्यात १७ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत घवघवीत यश मिळवले. १७पैकी नायगाव व हिमायतनगर (नांदेड), उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदुरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या ७ नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व शेवगाव, रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि म्हसळा अशा चार नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बुहमत पटकावले. चार नगरपालिकांसह एकूण ७८ जागा जिंकून जोरदार मुंसडी मारली आहे. यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेत भाजपाचा दारुण पराभव झाला. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड व अहमदनगर महानगरपालिकेच्या तसेच निलंगा व हिंगणघाट नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला रायगड जिल्ह्यातील तळा आणि पोलादपूर नगरपालिकेत बहुमत मिळाले.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्णातील गोंडपिंपरी, जिवनी व कोरपना या तीन नगर पंचायतीत भाजपाचा दारुण पराभव झाला. कोरपना येथील एकही जागा भाजपाला जिंकता आलेली नाही.पुरस्कृत अपक्षही विजयीराज्य निवडणूक आयोगाकडील अधिकृत आकडेवारीनुसार, काँग्रेस १०४ तर राष्ट्रवादीला ७८ जागा मिळाल्या आहेत. मात्र ही आकडेवारी चिन्हावर लढलेल्या उमेदवारांची असून, काही ठिकाणी पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार निवडून आल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.चेंबूरची जागा शिवसेनेकडेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे समर्थक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे झालेल्या महापालिकेच्या चेंबूर-घाटला प्रभागात पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पाटणकर विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र नगराळे यांचा पराभव केला.