शहरं
Join us  
Trending Stories
1
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
2
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
3
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
4
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
5
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
6
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
7
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
8
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
9
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
10
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
11
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
12
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
13
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
14
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
15
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
16
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
17
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
18
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
19
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
20
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान

आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाय, भाई जगताप यांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 2:37 PM

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, या सर्वांत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही कुटुंबाला त्रास होऊ नये हे सर्वांचं कर्तव्य आहे. शिवसैनिक हा रिअॅक्टिव्ह आहे. आतापर्यंत शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे. ही वस्तुस्थिती. काय घडावं तो ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कुटुंबीयांपर्यंत हे जाता कामा नये. कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल,” असं भाई जगताप म्हणाले.

“महाविकास आघाडी होण्याचं कारण काँग्रेसच होतं. काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्राची परवड, मुंबईची पिछेहाट, फडणवीसांनी जे महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनं भूमिका मांडली. आम्हाला सत्तेची हाव नाही. जे महाराष्ट्राचं वाटोळं करतायत त्यांना थांबवायला हवं ही भूमिका आजही आहे आणि पुढेही राहिल. आमचे ४४ आमदार ठाम आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम आहोत,” असंही ते म्हणाले. जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. परंतु असं अनेकदा झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना असा प्रकार झाला होता. त्यावर मात केली गेल्याचंही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची इभ्रत घालून सरकार चालवू नका ही सर्वांनाच विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेनाbhai jagtapअशोक जगतापEknath Shindeएकनाथ शिंदे