शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

“मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 12:42 PM

न्यायपालिकेने न्याय करून राज्यातील लोकशाही वाचवली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर: राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना, दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या अनेकविध धोरणांवरून तसेच निर्णयांवरून विरोधकांकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्रावर निशाणा साधल असून, मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील, असे परखड मत व्यक्त केले आहे. 

महाराष्ट्रात पोरखेळ सुरु झाला आहे, अतिशय नकारात्मकपणे बातम्या येत आहेत, त्यामुळे कितीही कटू असले, तरी न्यायपालिकेला न्याय करून लोकशाही वाचवली पाहिजे, राज्यपालांच्या अधिकारांच्या गैरवापरावर स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील, पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

शिवसेनेतील फुटीर विलीनीकरणाचा मुद्दा विसरून गेले

शिवसेनेतून दोन तृतियांश फुटून बाजूला गेले, पण विलीनीकरणाचा मुद्दा विसरून गेले. त्यामुळे गुवाहाटीतून राज्यात परतल्यानंतर वकीलांशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा फुटीर गटाच्या लक्षात आला असावा. सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन खंडपीठाने शपथविधीसाठी दिलेली परवानगी चुकीची होती, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यपालांनी दोघांचा शपथविधी करून टाकला, त्यांना कशाचेच बंधन नाही. विधिमंडळाचे अधिवेशन फक्त मुख्यमंत्री बोलवू शकतात, त्यानंतर अध्यक्षांची निवड लावली, त्यापूर्वी दीड वर्ष अध्यक्षांची निवडणूक कायदेशीर बाब आहे, म्हणून लांबणीवर लावली, न्यायपालिकेने प्रामाणिक न्याय केला, तर सगळे बेकायदेशीर असल्याचा हल्लाबोल केला. घटनेनुसार किमान १२ मंत्री असावे लागतात, त्यामुळे घटनेचे उल्लंघन झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलेय. आता नवीन कर्ज मिळेल असे वाटत नाही. देशात  कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी फसली आहे. अनेक अविचारी  निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जात आहेत. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोरोनाचे कारण दिले जाते मात्र ते खरे नाही. कोरोनाच्या आधीपासून अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदी सरकारकडून एकामागून एक चुका होत गेल्याचा परिणाम झाला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCentral Governmentकेंद्र सरकार