शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:52 IST

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यावर भाजपने (BJP) विधानसभेत आक्रमक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचा भाजपवर पलटवारजळगाव प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासनगृह विभागासह महिला आणि बालकल्याण विभागही चौकशी करेल - यशोमती ठाकूर

मुंबई : जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यावर भाजपने (BJP) विधानसभेत आक्रमक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते, अशी विचारणा त्यांनी केली आहे. (congress leader yashomati thakur asked why bjp leaders keep their mouth shut on hathras rape case)

जळगाव प्रकरणी गृहमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहे. गृह विभागाकडूनही चौकशी होईल. परंतु, महिला बालकल्याण विभागही चौकशी करेल, असे आश्वासन देत यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, ही घटना निंदनीय आहे आणि याचे राजकारण केले जाते आहे. महिला ही महिला असते, ती काही कोणत्या पक्षाची नसते. पण उतर प्रदेशच्या हाथरस येथे असे प्रकरण घडले तेव्हा भाजप नेते गप्प होते, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

भाजपची आक्रमक भूमिका

जळगाव प्रकरणाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर 

नेमके प्रकरण काय आहे?

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा तसेच भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनYashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेसBJPभाजपाHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliticsराजकारण