शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘ते’ पत्र सार्वजनिक केल्याने काँग्रेसचे नेतृत्व नाराज; केदार यांच्याविरुद्ध आशिष देशमुखांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 6:28 AM

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवरनवी दिल्ली : पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी दोनच दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या आशिष रणजीत देशमुख यांनी आघाडी सरकारमधील मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात एक पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मात्र, हे पत्र सार्वजनिक केल्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व याला अंतर्गत गटबाजीचा परिणाम मानते. 

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचेही म्हणणे आहे की, अशा प्रकारे सार्वजनिक वक्तव्ये पक्ष स्वीकार करणार नाही. आशिष देशमुख यांच्या पत्रामागे काँग्रेसच्याच काही नेत्यांचा हात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आशिष देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.

केवळ भाजप नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यासाठी ते सातत्याने आघाडी सरकारविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते केदार यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये जातील. दरम्यान, आशिष देशमुख यांच्या पत्रामागचा हेतू काय होता तसेच कोणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिले गेले याची माहिती पक्ष नेतृत्व घेत आहे. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेस