शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी

By admin | Published: June 10, 2017 4:00 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 10- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारने तोडगा काढूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रश्नांवर राजकारण खेळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने भाजपा प्रवक्ते विविध शहरांमध्ये विकासकामांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत प्रवकत्या शायना एन सी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्याची महिती दिली. 
शेतकऱ्यांना अनुदान देणं, शेतीमालाला भाववाढ हे तात्पुरते उपाय आहेत. अशीच आश्वासनं आधीच्या सरकारनेसुद्धा दिली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजपा अडीच वर्षांपासून काम करतं आहे, असंही पत्रकार परिषदे दरम्यान शायना एन सी म्हणाल्या आहेत. 
 
भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छेदिन
भाजपाच्या आधी जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली. भाजपा सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. या काळात शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला योग्य हमी भाव दिल्याचं दिसून येतं आहे. मागील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक तूर भाजपाच्या काळात खरेदी केली. खऱ्या अर्थाने भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात युरिया खत शेतकऱ्यांना काळ्या बाजाराने घ्यावे लागत होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे. शेतकऱ्यांच्या कृती समितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच मतभेद असल्याने चर्चा होत नाही. ही शोकांतिका आहे. असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमूद केलं.