शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:05 IST

काही जागांचा तिढा : उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून सध्या प्रत्येकी १०६-१०६ जागा निश्चित झाल्या आहेत. काही जागांबाबत बाद आहे. काँग्रेसची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी दिल्लीतपार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आमदार के. सी. पाडवी, छाननी समितीचे सदस्य हरीश चौधरी व मणिकाम टागोर उपस्थित होते.

येत्या आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी निश्चित आहे. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या १०६-१०६ जागा निश्चित केल्या आहेत.उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमान शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप व रिपब्लिकन पक्षाचे कवाडे गट व गवई गट हे प्रमुख पक्ष आहेत. यावेळी मनसेला आघाडीत स्थान द्यावे काय? याबद्दल काहीही चर्चा झालेली नसल्याचे समजते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवर अद्यापही तिढा कायम असल्याची कबुली या काँग्रेस नेत्याने दिली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या जागा सध्या काँग्रेसकडे असून काँग्रेसनेही दावा केला आहे. हा वाद आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चर्चेनंतर सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसची यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातविधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता असल्याचे छाननी समितीच्या एका सदस्याने सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा