शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:00 IST

GDP: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थचक्रावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची बिकट परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका होताना दिसत आहे. आताही काँग्रेसनेपंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. (congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp)

 केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केली असून, यानुसार भारताचा जीडीपी उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

पंतप्रधानांची तुलना हिटलरशी बरोबर नाही

कांही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते १००% बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे. 

“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी

दरम्यान, केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात, तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोप करत १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आतापर्यंत किती पुरवठा झाला. कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNitin Rautनितीन राऊतPoliticsराजकारण