शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 12:36 IST

Prithviraj Chavan on MVA, Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपात मित्रपक्षांनी जागांचा आकडा वाढवण्यासाठी अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Prithviraj Chavan Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढलेला असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जागावाटपाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. मित्रपक्षाने आपला आकडा वाढवण्याच्या नादात जे उमेदवार दिले आहेत, ते अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही, असे पृथ्वारीज चव्हाण म्हणाले. 

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल भाष्य केलं.

मित्रपक्षाने चुकीचे उमेदवार दिले -पृथ्वीराज चव्हाण

"जिथे काँग्रेसचा दावा होता, तिथे मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत. आणि आपला एकूण आकडा वाढवण्याच्या नादामध्ये... त्या उमेदवारांची अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही, असे ते उमेदवार पुढे आले आहेत. कुठल्या पक्षाचे त्याबद्दल मी बोलणार नाही", असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बंडखोर झालेले आहेत का? झाले आहेत. दोन-तीन उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहेत, जिथे काँग्रेसचा बंडखोर उमेदवार सहज निवडून येईल. पण, आता पुढे काय होईल माहिती नाही." 

वाटाघाटीमध्ये कोणत्या चुका झाल्या? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

"वाटाघाटींमध्ये चुका झाल्यात. दोन गोष्टींमध्ये चुका झाल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी पाठवले. ते स्वतः प्रचाराला मोकळे राहिले. आमच्याकडे सगळेच स्वतः वाटाघाटीसाठी आले. रस्त्यावर कोणीच नव्हतं", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

"काँग्रेस पक्षाने अंतर्गत बसून, गांभीर्याने चर्चा करून जागावाटपाबद्दल भूमिका ठरवायला पाहिजे होती. सुरूवातीला अवास्तव भूमिका मांडली, म्हणजे हे पण चांगलं; ते पण चांगलं. पण, चर्चेला गेल्यावर ते झालं नाही. वाटाघाटीमध्ये आम्ही कमी पडलो हे मान्य करतो. पण, फार चुका झाल्या असं नाही. पहिली यादी फार चांगली होती. दुसऱ्या यादीमध्ये तडजोडीमध्ये कमी झालं. पण, एकंदरीत मला वाटतं की आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या का, तर हे व्यावहारिक नव्हतं", असे सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी वाटाघाटातील चुका अधोरेखित केल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार