शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

“राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:18 IST

Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आहेत. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. आताच्या घडीला राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. 

तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून टीका केली आहे. 

तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली?

आनंद आहे, तहव्वूर राणाला भारतात आणले असेल तर दाऊदला का आणले नाही.  या बॉम्बस्फोटामागे कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. जबाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणावे.  महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली? महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत, म्हणून आता जुमलेबाजी करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

दरम्यान, तहव्वूर राणा याला भारतात आणले गेले आहे, याबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. भारताचे मोठे यश आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याविरुद्ध कोणता खटला दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबद्दल बोलणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दल बोलेन, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार