शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

“राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:37 IST

Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Vijay Wadettiwar News: मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर विरोधक टीका करत असताना, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. 

मीडियाशी बोलताना काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झाल्या घटनेबाबत भाष्य केले. राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना-मनसे पक्षात भाजपाने भांडण लावले आहे. ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षात भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असे सांगत, परमबीर सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भाजपाचा सहारा घेतला. ते भाजपाच्या इशाऱ्यावर बोलतात, हे काही लपून राहिलेले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना बंड करायची आवश्यकता काय होती. ईडी, सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता हे नक्की, असे म्हणत कुठे काही झाले तरी शरद पवारांचे नाव घेतले जाते. मनोज जरांगे यांची अलीकडील विधाने पाहिली तर, त्यांनी शरद पवारांवरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही वादात दिसत नाहीत, असे विजय वडेट्टीवार यांनी एबीपीशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे