शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:10 IST

Congress Vikas Thackeray News: आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या ठाकरे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे सांगितले जात आहे.

Congress Vikas Thackeray News: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले. यानंतर आता महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, संजय राऊतांच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी भाष्य केले.

संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; विकास ठाकरे काय म्हणाले?

पक्ष वाढीच्या संदर्भात त्यांचे जे विचार आहेत ते योग्यच आहे. कारण कार्यकर्त्यांची एक प्रकारे ओरड असते की, आम्हाला संधी मिळत नाही. यामुळे स्वबळावर लढल्यास बरे होईल. नागपूर जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. नागपूर शहराचा महापौर म्हणूनही काम केले आहे. अनेक वर्षापासून संघटनेचे काम करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जे मत आहे ते वैयक्तिकरित्या आपल्यासमोर मांडले आहे, असे काँग्रेस नेते विकास ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्य असेल. परंतु, नागपूरमध्ये तरी काँग्रेस हा पक्ष सर्व निवडणुका स्वबळावर लढत आला आहे. काँग्रेस पक्षाला प्रत्येक बुथवर चांगले मतदान होत आले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर कुठली हरकत नाही. कार्यकर्त्यांबाबत संधी मिळत नसल्याच्या  वक्तव्यावर सहमत आहे. ती खरी गोष्ट असून पक्ष वाढीसाठी या निवडणुका स्वबळावरच लढल्या पाहिजेत, असे विकास ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVikas Thackreyविकास ठाकरेVikas Thakreविकास ठाकरेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत