शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !

By admin | Published: September 14, 2015 2:01 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. मराठवाड्याने यापुढील निवडणुका केवळ पाण्याच्या मुद्यावरच लढवाव्यात, असे आवाहन त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.बारामतीकरांची पाठिंब्याची चाल नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे पवारांना प्रयत्न करूनही सत्तेबाहेर बसावे लागले, असा टोला विखे- पाटील यांनी लगावला. गेल्याच आठवड्यात विखे यांनी राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे- पाटील यांनी कोणाचा मुखवटा घातला आहे, असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. विखे- पाटील यांनी मात्र त्याला उत्तर न देता रविवारी पुन्हा पवारांवर आरोपांची सरबत्ती केली. बारामतीकरांनी सत्ता पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार राबवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. सत्ता अनुकूल असूनही पवारांनी तेव्हा पाणीप्रश्न प्रलंबित ठेवला. फडणवीस सरकार पाडण्यासाठी त्यांनी सेनेला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने ते निराश झाले असावेत. सत्तेत भागीदारी मिळाली असती तर त्यांनी मोर्चा काढला असता का, असा प्रश्न विखे-पाटील यांनी केला. एवढी वर्षे पाटबंधारे खाते सांभाळूनही सिंचनाचा प्रश्न कासुटला नाही, हे काम अनावधानाने राहून गेले का, असा सवाल त्यांनी केला. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जीवाचे रान केले असते. सरकारने केंद्राचा निधी व कर्जरोख्यातून हा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)