शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

By admin | Published: April 06, 2016 5:01 AM

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्युषाचे अजूनही माजी प्रियकरांसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे प्रत्युषाने तिच्या काकूला सांगितले होते. ही बाब प्रत्युषाच्या आईला कळल्यावर त्यांनी मंगळवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बांगुरनगर पोलिसांनी राहुलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये प्रत्युषाचे काका दिपांकर बॅनर्र्जी आणि काकू बर्नाली बॅनर्जी राहतात. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्युषाने तीन वेळा काकींची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याबाबत तिने काकूला सांगितले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली असल्याचे काकूचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रत्युषाच्या आईला (सोमा बॅनर्जी) सांगितले होते. मंगळवारी सोमा बॅनर्जी यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकर राहुल राज सिंगविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक तसेच शारीरिक छळ करणे, शिविगाळ करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी वर्तवली आहे. >लाईफ ईज वेरी डिफिकल्ट पापाच्प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आईच्या भावानांचाही बांध फुटला. राहुलने आम्हालाही प्रत्युषापासून दूर केला असल्याचा आरोप प्रत्युषाच्या आईने केला आहे. त्यात आत्महत्येच्या तीन दिवसापूर्वीच प्रत्युषाने वडीलांकडे आपले दुख मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिने’लाईफ इज वेरी डिफिकल्ट पापा’ असे तिने वडिलांना सांगितले होते. च्सोमा बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने नेहमी आम्हाला प्रत्युषापासून दुर ठेवले. आम्ही रांचीचे बाहुबली असून माझ्याकडे खूप पैसा असल्याचे त्याने प्रत्युषाला सांगितले होते. आम्ही त्याच्याबाबत जास्त चौकशी करत असल्याने त्याने आम्हाला नेहमी तिच्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही राहुलच्या कुटुंबीयांना कधीच भेटलो नाही. प्रत्युषानेही तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत काहीच सांगितले नाही. ३० मार्च रोजी जेव्हा प्रत्युषासोबत तिच्या वडिलांशी बोलणे झाले तेव्हा ती फार दु:खी वाटत होती. कामाच्या ताण असेल म्हणून आम्ही तिची समजूत काढली. तेव्हाच जर प्रत्युषाने आम्हाला सांगितले असते तर ही वेळच आली नसती असेही बॅनर्जी यांनी सांगितले.