शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus: ‘पॉझिटिव्ह’ शीख यात्रेकरूंवरून वाद; पंजाबच्या आरोपाचे महाराष्ट्राकडून खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:46 IST

नांदेडहून गेलेले २१५ जण पॉझिटिव्ह

चंदीगड/मुंबई : नांदेडहून पंजाबला परत पाठविलेल्या शीख यात्रेकरूंपैकी २१५ यात्रेकरू तेथे पोहोचल्यानंतर कोरोना चाचणी केली असता ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यावरून पंजाब व महाराष्ट्रात शनिवारी थोडा वाद झाला. महाराष्ट्राने या यात्रेकरूंना कोरोनाची चाचणी न करताच परत पाठविल्याचा आरोप करून पंजाबने नाराजी व्यक्त केली, तर महाराष्ट्राने या आरोपाचा ठामपणे इन्कार केला.

नांदेड येथील तख्त हुजूरसाहीबला आलेले सुमारे ४,००० यात्रेकरू ‘लॉकडाऊन’मुळे गेले ४० दिवस तेथेच अडकून पडले होते. त्यांची सचखंडसाहीब व लंगरसाहीब गुरुद्वारांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यांत बसने परत पाठविण्याची केंद्राने परवानगी दिल्यानंतर यापैकी बऱ्याच यात्रेकरूंना पंजाबला पाठविण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यापैकी २१५जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यावरून हा वाद झाला. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या यात्रेकरूंना परत पाठविताना त्यांची चाचणीही न करता पाठविल्याबद्दल पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी नाराजी व निषेध व्यक्त करणारे पत्र महाराष्ट्राला पाठविले. महाराष्ट्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने पंजाबच्या या आरोपाचे खंडन केले. हा अधिकारी म्हणाला की, हे यात्रेकरू बसमध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत याची खात्री करूनच त्यांना पाठविण्यात आले होते.उत्तर प्रदेश सरकारने पाठविलेल्या बसने झांशीमार्गे महाराष्ट्रातून परत आलेल्या स्थलांतरित मजुरांपैकी सात जण तेथे पोहोचल्यानंतर कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याचे बस्तीच्या जिल्हाधिकाºयांनी सांगितले.‘हा तर बदनामीचा कट’तबलिगी जमातनंतर शीख समुदायाला बदनाम करण्याचा कट असल्याची टीका अकाल तख्तचे हरप्रीत सिंग यांनी केली आहे. महाराष्ट्रातून पंजाबमध्ये परत गेलेल्या भाविकांमधील काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिखांची सर्वोच्च संस्था जथेदारने याची तुलना आता मुस्लिम समुदायाच्या तबलिगी जमातशी केली आहे. हा मोठा कट असल्याचा आरोपही शीख समुदायाच्या या नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या