शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

CoronaVirus News: कोरोना मृत्यूवरून फडणवीसांचे ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:43 IST

हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.

- यदु जोशीमुंबई : कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सरकारकडून लपविली जात असल्याचा आरोप आपण केल्यानंतर एका दिवसात १३५२ इतका मृतांचा आकडा वाढला; पण आजही सरकारकडून ही लपवाछपवी सुरूच आहे. हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.सरकारच्या पोर्टलवर नोंद नसलेल्या हजाराहून अधिक मृत्यूंव्यतिरिक्त अनेकांचा मृत्यू इस्पितळात नेण्यापूर्वीच झाला, स्वॅब घेतलेला नव्हता. त्यामुळे ते कोरोनाने दगावले याचे पुरावेही राहिलेले नाहीत. आकडेवारी कशी लपवली जात आहे याचा उलगडा आपण लवकरच करू, असे फडणवीस म्हणाले.कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासन व महापालिकांनी अंदाधुंद खरेदी केली. १२०० ते दोन हजार रुपये किमतीच्या बॉडी बॅगची खरेदी ६५०० रुपयांत करण्यात आली. पीपीई किटची खरेदी अव्वाच्या सव्वा दराने झाली. हळूहळू खूप गोष्टी बाहेर येतील.कोरोनाचा मुकाबला करताना सरकारमध्ये समन्वय नाही. अशी लढाई भगवान भरोसे लढता येत नाही. उद्धवजी फेल झाले की पास झाले अशा प्रकारचे सर्टिफिकेट द्यायला मी बसलेलो नाही. ही निर्णय घेण्याची वेळ आहे, टाळण्याची नाही. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी निर्णयक्षम व्हायला हवे. निर्णय स्वत: घ्यावे लागतात. नोकरशाही निर्णय घेते अशी सध्याची चर्चा आहे.परीक्षांचा घोळ संपवाविद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ हा राज्य सरकारची अनिर्णीत राहण्याची स्थिती आणि अनेक पॉवर सेंटर यामुळे निर्माण झाला. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, राज्यपालांना आहे असे मत राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिले असल्याची माझी माहिती आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे काय हे सरकारने ठरवायला हवे. अमुकच निर्णय घ्या असे आमचे म्हणणे नाही परंतू एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसह सर्वांबाबत तत्काळ निर्णय घ्या एवढाच आमचा आग्रह आहे.इतकी लाचारी मी बघितली नाहीमी पहिले असे सरकार पाहिले की विरोधकांनी त्यांचे गोडवे गावेत असे त्यांना वाटते. तसे काम केले तर तेही करू. सरकारचे अपयश दिसत असताना टीका करणारच. सरकार अस्थिर करण्यात रस नाही, ते आपसातील संघर्षातूनच पडेल. शंभर वर्षे जुन्या पक्षाला कुरकुरणारी खाट म्हटल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख म्हणतात, आम्ही कुरकुरणारी खाट असू, पण काय म्हणायचेय ते समजून घ्या. इतकी लाचारी मी बघितली नाही. लाचारीचे सरकार फार काळ टिकत नसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस