शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

coronavirus : वृत्तपत्र वितरणबंदीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा - शिवाजीराव मोघे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 17:57 IST

वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा

यवतमाळ - कोरोना संकटाच्या काळात वर्तमानपत्र विश्वासार्ह माध्यम असल्याची ग्वाही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेली आहे. असे असताना वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा, असे मत माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले आहे. स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीसाठी होणारी गर्दी धोकादायक ठरेल, अशीही चिंता अ‍ॅड.मोघे यांनी व्यक्त केली आहे.वृत्तपत्र घरोघरी पोहोचले नाही तर, नागरिकांना सविस्तर आणि आपल्या गावातील, परिसरातील माहिती उपलब्ध होणार नाही. बातम्याच नव्हे तर इतरही माहिती वृत्तपत्रात असते. ही माहिती जाणून घेण्यापासून वाचक मुकतील. वृत्तपत्राची छपाई करायची, पण वितरणावर बंदी हे कुठले धोरण, असा प्रश्न अ‍ॅड.मोघे यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसापर्यंत वृत्तपत्र पोहोचते. अलीकडे उलटसुलट बातम्यांना पेव फुटले आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडतात. वस्तुनिष्ठ बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र करीत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या लोकांना विविध घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. शासनाला मदतनिधी देण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्याने मदत करणारे अनेक हात पुढे येत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून मदत निधी दिला जात आहे. तेरवीचा खर्च टाळून गरजूंना अन्नदान केले जात आहे. लोकजागृतीचे काम वृत्तपत्र करीत आहे. यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. शासनाला या माध्यमातून मोठा हातभार लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्र वितरणावरील बंदीबाबत फेरविचार करावा, असे अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMediaमाध्यमेShivajirao Mogheशिवाजीराव मोघे