शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Coronavirus: "एकदाचं दार उघडलं; आता दुसरी काही लफडी करू नका"; निर्बंध हटवण्यावर डॉ. रवी गोडसेंची मार्मिक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:50 IST

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते.

मुंबई – मागील २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीमुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली जगत होती. लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे लोकांचे जगणं कठीण झाले. या महामारीमुळे लाखो लोकांचा जीव गेला. परंतु लसीकरणामुळे सर्व देशात नवी आशा निर्माण झाली. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली. भारतातही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २ वर्षापासून लावलेले निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही येत्या गुढी पाडव्यापासून म्हणजे २ एप्रिलपासून राज्यात लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्क घालण्याचीही सक्ती नाही असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावर कोरोना विश्लेषक डॉक्टर रवी गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. रवी गोडसे(Dr Ravi Godse) म्हणतात की, चिऊ ताई, चिऊ ताईनं दार उघड, शेवटी एकदाच दार उघडलं. उशीरा का होईना दार उघडलं आहे. शाब्बास, लसीकरणाच्या कामाला चांगलं सहकार्य केले. आता चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना चिमुकली विनंती आहे. आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करू नका. दार उघडलंय ते सतत कायम ठेवा. उडून उडून जावा. दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावं अशी मार्मिक टीप्पणी रवी गोडसेंनी केली आहे.

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते. ते म्हणाले होते की, भारतातील कम्युनिटी ट्रान्समिशनचं प्रमाण पाहता भारतात आता मास्क वापरण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं माझं वैद्यकीय वैयक्तिक मत आहे. हे मी हजारो रुग्णांवर केलेले उपचार आणि अनुभवातून सांगत आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांनी आता मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. इटलीने टास्क फोर्सला सुट्टी दिली आहे. आता कोरोनासोबतच राहायचं आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाव्या लागलेल्या आणि तिथे ऑक्सिजनची गरज भासलेल्या किती लोकांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता, याचा आढावा घेतला तर प्रत्येक माणसाला स्वत:चं उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लोकांना आवाहन

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDr Ravi Godseडॉ. रवी गोडसे