शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
11
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

Coronavirus: "एकदाचं दार उघडलं; आता दुसरी काही लफडी करू नका"; निर्बंध हटवण्यावर डॉ. रवी गोडसेंची मार्मिक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:50 PM

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते.

मुंबई – मागील २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीमुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली जगत होती. लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे लोकांचे जगणं कठीण झाले. या महामारीमुळे लाखो लोकांचा जीव गेला. परंतु लसीकरणामुळे सर्व देशात नवी आशा निर्माण झाली. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली. भारतातही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २ वर्षापासून लावलेले निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही येत्या गुढी पाडव्यापासून म्हणजे २ एप्रिलपासून राज्यात लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्क घालण्याचीही सक्ती नाही असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावर कोरोना विश्लेषक डॉक्टर रवी गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. रवी गोडसे(Dr Ravi Godse) म्हणतात की, चिऊ ताई, चिऊ ताईनं दार उघड, शेवटी एकदाच दार उघडलं. उशीरा का होईना दार उघडलं आहे. शाब्बास, लसीकरणाच्या कामाला चांगलं सहकार्य केले. आता चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना चिमुकली विनंती आहे. आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करू नका. दार उघडलंय ते सतत कायम ठेवा. उडून उडून जावा. दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावं अशी मार्मिक टीप्पणी रवी गोडसेंनी केली आहे.

अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते. ते म्हणाले होते की, भारतातील कम्युनिटी ट्रान्समिशनचं प्रमाण पाहता भारतात आता मास्क वापरण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं माझं वैद्यकीय वैयक्तिक मत आहे. हे मी हजारो रुग्णांवर केलेले उपचार आणि अनुभवातून सांगत आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांनी आता मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. इटलीने टास्क फोर्सला सुट्टी दिली आहे. आता कोरोनासोबतच राहायचं आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाव्या लागलेल्या आणि तिथे ऑक्सिजनची गरज भासलेल्या किती लोकांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता, याचा आढावा घेतला तर प्रत्येक माणसाला स्वत:चं उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लोकांना आवाहन

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDr Ravi Godseडॉ. रवी गोडसे