शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

CoronaVirus News: उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 13:52 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोरोना संकटातील कामगिरीवर, नारायण राणेंच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर शहांचं भाष्य

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा पावणे दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यातील ६५ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना संकटाला तोंड देण्यात राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कमी पडत असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या. भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं आहे.देशातल्या प्रत्येक राज्यानं कोरोनाविरुद्ध संघर्ष केला आहे आणि अजूनही संघर्ष सुरूच आहे. या लढाईकडे आकड्याच्या दृष्टीकोनातून पाहायला नको. हे राज्य अपयशी ठरलं, ते यशस्वी झालं, असं आकडेवारी पाहून ठरवायला नको. ही लढाई प्रत्येकाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, देशातील जनता सगळेच जण ही लढाई लढत आहेत. ज्याला हे शक्य होतं, त्यानं ते आपल्या परीनं उत्तम प्रकारे केलं आहे, असं अमित शहा म्हणाले. ते 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. महाराष्ट्रात भाजपा खासदार नारायण राणेंनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर अमित शहांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं. 'ती त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपाची मागणी नाही. प्रत्येक राज्यानं त्यांना शक्य होतं, तितकं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला आहे,' असं शहा म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासकीय अनुभव कमी पडतोय का, असा प्रश्नदेखील अमित शहांना विचारण्यात आला. त्यावर मी या प्रकारचं कोणतंही भाष्य करणार नाही. प्रत्येक राज्यातल्या सरकारनं, तिथल्या प्रशासनानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम केलं आहे, असं उत्तर शहांनी दिलं. राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर वारंवार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली आहे. खासदार नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मुंबई लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. "मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"देश अनलॉक होऊ लागलाय, आता अधिक सावध राहण्याची गरज - नरेंद्र मोदीहॉलीवूडपासून हरिद्वारपर्यंत योग, आयुर्वेदाची चर्चा, कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी विषद केलं महत्त्व

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस