शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 18:19 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत अचानक वाढ झाली आहे. गरोदर कोरोनाग्रस्त महिलांचे नवजात बालक कोरोनामुक्त, ही आनंददायी बाब आहे. मात्र, या पुढची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यावरील पुढील संकटाची चाहूलही त्यांनी दिली. राज्यात जे बेड्स उपलब्ध करतोय, त्याठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजनची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, राज्यात पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पुढील ८ ते १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्याला येत्या काळात रक्ताची मोठी गरज लागणार आहे. यासाठी रक्तदान करणाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले. उन्हाळी साथीपासून दूर राहिलो तसेच पावसाळी रोगापासून दूर राहण्याचा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला. तसेच कोरोना विषाणूवर औषध नाही खरं असलं तरी रुग्णांना बरे करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. ताप अंगावर काढू नका, थकवा जाणवतोय तर तात्काळ डॉक्टरांकडे जा, असे आवाहनही त्यांनी केले. शेवटच्या टप्प्यात आल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर येत असल्याचेही ते म्हणाले.

पुढचे दिवस धोक्याचे....कोरोना रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसचं हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टेंसिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागेल. कोरोनाकडे सकारात्मकदृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे कोरोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन एकदम उठवता येणार नाही, आयुष्याची गाडी हळूहळू रुळावर आणायची आहे. लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरु करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू

खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र

कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBlood Bankरक्तपेढीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस