शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेत राज्यात किती जणांना होऊ शकते कोरोनाची बाधा? मंत्र्यांनी सांगितला भीतीदायक आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 09:29 IST

CoronaVirus News: लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती; परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू

मुंबई: राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच देशात डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण आढळले असून त्यातील २० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील ५० लाख लोकांना लागण होईल आणि यातील ५ लाख लहान मुलं असतील, असा धोक्याचा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना राजेंद्र शिंगणे यांनी कोरोना संकट आणि तिसऱ्या लाटेबद्दल भाष्य केलं. 'तिसरी लाट टोक गाठेल, तेव्हा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्या घरात असेल. जवळपास ५ लाख मुलांना कोरोनाची लागण होईल. यापैकी २.५० लाख मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली आहे,' अशी माहिती शिंगणे यांनी दिली.

तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यविषयक सेवा सुविधा वाढवण्याचं, औषधांचा साठा करण्याचं, आरोग्य कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्याचं काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका पाहता बालरोगतज्ज्ञांची फळीदेखील सुसज्ज ठेवण्यात येत आहे, असं शिंगणे यांनी पुढे सांगितलं.

डेल्टा प्लसचा धोका वाढल्यानं पहिला, दुसरा स्तर रद्दकोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. आजच्या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत. 

आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हे हे स्तर एकमध्ये होते. याशिवाय आठ जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते.  आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी शिथिलता मिळवायची असेल तर एक आठवड्याचा कमी होणारा पॉझिटिव्हिटी रेट बघायचे. आता तो दोन आठवड्यांचा बघितला जाईल. अधिक निर्बंध लावायचे असतील तर मात्र दोन आठवडे वाट बघण्याची गरज नसेल. जिल्हा प्रशासन गरजेनुसार निर्णय घेऊ शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस