शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:51 IST

Coronavirus Restrictions in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; व्यापारी वर्गात मोठी निराशा

ठळक मुद्देराज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.व्यापारी वर्गात मोठी निराशा.

कोरोना रुग्णवाढीचा वेग देशाच्या तुलनेत कमी असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका पाहता निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नाही. दुकाने, रेस्टॉरंटंची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शाळा सुरू होण्यासाठीचा प्रोटोकॉल तयार नसल्याने त्या लगेच सुरू होतील अशी शक्यता नाही. मात्र १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. आठ दिवसांत डॉक्टरांच्या ८९९ जागा भरण्यात आल्या. पुढच्या काही दिवसांत १ हजार डॉक्टर भरले जातील. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा बैठकीत झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्याची दररोज लसीकरण करण्याची क्षमता १० ते १५ लाख इतकी आहे. मात्र सध्या पाच दिवसांत ६ ते ७ लाख लसीच राज्याला मिळत आहेत. ऑगस्टपर्यंत राज्याला ४ कोटींपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून २५ टक्के लस घेता येऊ शकते. तो वाटा आपल्या राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लवकर याबाबत निर्णय घेतील, अशी मला अशा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांतमागील एक महिना ७ ते ८ हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील ९३ टक्के रुग्ण १० जिल्ह्यांत आहेत. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत असून, नियमांची काटेकोट अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

...अन्यथा टोकाची भूमिका घेऊ, व्यापाऱ्यांचा इशाराशासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे व्यापार्‍यांवर अन्याय आहे. व्यापार्‍यांच्या पदरी निराशा आली असून व्यापार्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला. तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? आता आणखी वाट बघणे शक्य नाही. ताबडतोब परवानगी द्या, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपेChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र