शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

आपत्ती व्यवस्थापनात घेणार कार्पोरेट मदत - चंद्रकांत पाटील

By admin | Published: June 01, 2017 3:04 AM

नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने सामारे जाण्यासाठी कार्पोरेट सहभाग घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन (सीआयडीएम) या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरात सरकारसह विविध सरकारी यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सीआयडीएम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, रासायनिक, औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शासन सदैव सज्ज आहेच, परंतु उद्योग, रासायनिक कंपन्या, संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची आवश्यकता अधिक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी सामूहीक प्रयत्नांची गरज आहे. राज्यात मुख्यत्वे रासायनिक प्रक्रिया, उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विषारी कच-याच्या विल्हेवाटीदरम्यान औद्योगिक दुर्घटना होतात. अनेक गोदामे हे निवासी आणि औद्योगिक वसाहतींच्या जवळपास आहेत त्यामुळे या भागांचा धोका वाढतो, असे पाटील म्हणाले.उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, ‘१९८४ मधील भोपाळ दुर्घटनेनंतर अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यानंतर मोठ्या रासायनिक व औद्योगिक दुर्घटना कमी झाल्या. मात्र दुर्घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी डोंबिवलीत झालेल्या जीवितहानीमुळे ही बाब समोर आली.’सर्वोत्तम कार्यप्रणालीवर भरया परिषदेसाठी देशातील वीस राज्यातील चारशे हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. परिषदेत, विश्वस्तरावरील औद्योगिक सुरक्षा पद्धतीवर भर देणे, औद्योगिक अपघातांना तातडीने प्रतिसाद, सुरक्षेमध्ये उत्कृष्ट पद्धती राबविलेल्या कंपन्यांची यशोगाथा, घातक/विषारी द्रव्ये, पेट्रोलियम उत्पादने आणि गॅस आदींच्या वाहतुकीवेळी अपघात कमी करण्यासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान निर्मिती आदी बाबींवर भर दिला जाईल.