शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’

By admin | Published: August 06, 2016 3:01 AM

परिसरातील रस्त्यांच दुरवस्थेला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे.

विरार: या परिसरातील रस्त्यांच दुरवस्थेला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांत झालेल्या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मुंबई महापालिकेच्या धर्तीवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी केली आहे. वसई विरार परिसरातील मुख्य रस्ते आणि अनेक अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डे बुजवण्यातही पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनमानसात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच चौधरी यांनी थेट प्रशासन आणि ठेकेदारांवरच निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे चौधरी हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे अतिशय निकटचे समजले जातात. त्यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीकडून पहिल्यांदा ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात उघडपणे तोफ डागली गेल्याने सत्ताधारी आणि प्रशासनात पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जाते. निकृष्ट कामांमुळेच रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच मे महिन्यांच्या १५ तारखेनंतर रस्त्यांची व अन्य खोदकामे केली जात नाहीत. मात्र, प्रशासनाचा अतिउत्साह आणि ठेकेदारावरील प्रेमापोटी विरार परिसरात भुयारी गटाराचे काम जूनअखेरर्पंत सुरु होते. त्यामुळेच विरार परिसरातील रस्त्यांची वाताहात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)