शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

आजारी कारखाने विक्रीतून भ्रष्टाचार!

By admin | Published: April 09, 2016 3:22 AM

राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले

जालना : राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले. यातून सुमारे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतीश तळेकर हे जनहित याचिका दाखल करणार आहेत. त्यात याचिकाकर्ते म्हणून आपली पहिली स्वाक्षरी राहील, अशी माहिती अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनासासाठी ते आले होते. याप्रसंगी ते म्हणाले, राज्यातील दुष्काळीस्थिती आणि शेतकरी आत्महत्येस सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. शेतकरी आत्महत्येमागे सर्वात महत्त्वाचे कारण हे सहकारी चळवळ मोडीत काढणे हेच आहे. (प्रतिनिधी)> भागवत- ओवैसी दोन विकृत टोकेभारत माता की जय बोलने आणि न बोलने यावरून होत असलेला वाद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि एमआयएमचे ओवैसी यांचे दोन विकृत टोके आहेत. ते म्हणाले, भारत माता की जय प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे, मात्र त्याची सक्ती नको, भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत राहुनच भारत मातेचा जयजयकार झाला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सबनीस म्हणाले.महाराष्ट्राचे तुकडे पाडू नका मराठवाडा आणि विदर्भासाठीच्या निधीची पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच लूट केली आहे. राज्यपालांचा आदेश न जुमानता ही लूट करण्यात आली. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला दु:ख आले. त्यातून वेगळ्या राज्याचा मुद्दा समोर आला. तेव्हा सरकारने त्यांचे दु:ख समजून घेऊन विकासासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे पाडू नये, असा आग्रह सबनीस यांनी केला.