शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

बांधकामे नियमित करण्यावर कोर्टाचे प्रश्नचिन्ह

By admin | Published: April 27, 2016 6:31 AM

राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले

मुंबई : राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, राज्य सरकारने हे धोरण आखण्यापूर्वी ‘इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी’ केला का? शहरांच्या नागरी सुविधांवर याचा किती परिणाम होईल, याचा विचार सरकारने केला का? असे सवाल करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. नवी मुंबईतील दिघा, पिंपरी-चिचवड, कल्याण-डोंबिवली इत्यादी ठिकाणांतील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वेगवगेळ्या जनहित याचिकांच्या निकालाद्वारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दिघा बेकायदा बांधकामप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, उच्च न्यायालयाने राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण आखण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला काही महिन्यांपूर्वी दिली. त्या वेळी उच्च न्यायालयाने हे धोरण न्यायालयाच्या परवानगीनेच अंतिम करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, राज्य सरकारने राज्यातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले. हे धोरण न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) घटनेशी विसंगत धोरणहे प्रस्तावित धोरण घटनेच्या अनुच्छेद १४ शी विसंगत असून, सरकारने सरसकट सगळ्यांनाच अभय दिले आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकार आरक्षित भूखंडाचे आरक्षणही हलवत आहे. सरकारचे हे धोरण एमआरटीपी कायद्याविरुद्ध आहे आणि न्यायालय ते कदापि सहन करू शकत नाही. - उच्च न्यायालयझोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?च्उच्च न्यायालयाने सरकारने या धोरणाद्वारे बेकायदा झोपडपट्ट्यांनाही नियमित करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची खरडपट्टी काढली. ‘याच न्यायालयाने २००० पर्यंतच्या बेकायदा झोपडपट्ट्या नियमित करण्याची सरकारची विनंती मान्य केली होती. मात्र, यापुढे मुदत वाढवायची असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते. मग तुम्ही २०१५ पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणासंदर्भातील निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला.