शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
2
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
3
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
5
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
6
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
7
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
9
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
10
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
11
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
12
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
13
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
14
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
15
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
16
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
17
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
18
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!
19
७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी
20
Success Mantra: आळस तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर 'हे' दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा!

बिहार सरकारचे आरक्षण कोर्टाने फेटाळले, मराठा आरक्षण टिकेल का? विनोद पाटलांनी सांगितले पर्याय

By बापू सोळुंके | Published: June 20, 2024 9:22 PM

याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा सवाल, मराठा समाजासाठी सगे सोयरे संदर्भात राज्यसरकारने जे परिपत्रक काढले होते.  त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.

छत्रपती संभाजीनगर:  बिहार सरकारने ओबीसी आणि अन्य जातींना जनगणना करून वाढवून दिलेले १५ टक्के आरक्षण आज न्यायालयाने फेटाळले. याचा विचार करताना महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण टिकेला का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यसरकारने याविषयी  भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी  याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.

विनोद पाटील म्हणाले की, बिहार सरकारने जनगणना करून ओबीसी आणि इतर समाजाला वाढवून दिलेले १५ टक्के आरक्षण आज कोर्टाने फेटाळले. याचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाशी संबंध काय, असा अनेकांना प्रश्न असेल. इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख या कोर्टात झाला. अशाच प्रकारचे आरक्षण महाराष्ट्र सरकारनेही दिले आहे. त्यामुळे यावर महाराष्ट्र सरकारनेही गांभीर्यपूर्वक विचार करावा. अशा परिस्थितीत आपल्यासमोर दोन पर्याय आहेत! सुप्रीम कोर्टातील प्रलंबित क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल लावून घेतला, तर याचा उपयोग संपूर्ण देशभरातील आरक्षणासाठी होईल.  दुसरा पर्याय असा की, महाराष्ट्र सरकारने   जनगणना करावी. तसे केंद्र सरकारला सुचवावे. संपूर्ण देशाची जनगणना होत असताना महाराष्ट्राची ही जनगणना करून आरक्षण त्या पद्धतीने देण्यात यावं, हे दोनच पर्याय आता शिल्लक आहेत. 

सगे-सोयऱ्याच्या कायदा करावामराठा समाजासाठी सगे सोयरे संदर्भात राज्यसरकारने जे परिपत्रक काढले होते.  त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. जेणेकरून मराठा समाजाला याचा नक्की लाभ मिळेल. सरकारने गांभीर्यपूर्वक हा निर्णय घ्यावा. बिहार आरक्षणासंदर्भातील निर्णय धक्कादायक आहे. बिहार सरकारचे आरक्षण कोर्टात टिकत नसेल, तर मराठा आरक्षण कसे टिकेल, याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण