शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

साहित्य संमेलन वादावर आता पडदा टाका !

By admin | Published: January 14, 2016 2:31 AM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता

मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता, परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. साहित्य संमेलनाला मी जाणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला जाणार असल्याचे संकेत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. तर पुण्यात भाजपाचे खा. अमर साबळे यांनीही वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. इतर साहित्यिकांबरोबर सबनीस यांचेही स्वागत करू, असे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापुढे भाषणातून वादग्रस्त विधान येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आमचा कधीच विरोध नव्हता. सबनीस यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आमचा आक्षेप होता. त्यांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंतप्रधानांबाबत असे विधान केले. (विशेष प्रतिनिधी) महामंडळाच्या कारभाराविरोधात तक्रारकाही साहित्यिकांनी एकत्र येत महामंडळाच्या कारभाराविरोधात विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद अडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मुरलीधर साठे, अनिल कुलकर्णी आणि अशोक मुळे यांनी ही तक्रार केली असून, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, महेश केळुस्कर, सुहास सोनावणे, अरुण म्हात्रे, भारत सासने, राजन खान, अ‍ॅड. सतीश गोराडे, मुकुंद आवटे अशा साहित्यिकांनी तक्रारीस पाठिंबा दिला आहे.संमेलनात आपण स्वत: उपस्थित राहू. अगदी सबनीसांचेही स्वागत आम्ही करू. हे संमेलन दिमाखात पार पाडण्यासाठी भाजपा व सरकार म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहे. - खा, अमर साबळे, भाजपा