शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

पाण्यासाठी महासभेत गदारोळ

By admin | Published: March 10, 2015 4:12 AM

पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद

कल्याण : पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी केडीएमसीच्या महासभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले़ यावर पाणी जोडण्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २३ कर्मचारी तातडीने दिले जातील, अशी ग्वाही आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिली.पूर्वेकडील नगरसेवकांनी पाणी समस्येचा विषय १८ फेब्रुवारीला महासभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या गदारोळानंतर महापौर कल्याणी पाटील यांनी जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत महासभा होणार नाही, असा पवित्रा घेत सभा तहकूब केली होती. दरम्यान सोमवारी बोलाविलेल्या सभेत हा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला. गेल्या महासभेत दिलेल्या आदेशाला २० दिवसांचा कालावधी होऊनही पाणीपुरवठ्यात कुठलीच सुधारणा झाली नसल्याकडे नगरसेविका माधुरी काळे यांनी लक्ष वेधले.पाणी वाढले नाही़ परंतु, जे कमी दाबाने उपलब्ध होते तेदेखील गढूळ असून पूर्वेत माणसे राहतात का जनावरे? असा सवाल माधुरी काळे यांनी केला. पाणीप्रश्न सुटणार नाही तोपर्यंत महासभा न घेण्याच्या आदेशाचा महापौरांना विसर पडला का? अशी विचारणादेखील या वेळी करण्यात आली. यावर संबंधित सभा ही तहकूब आहे़ नवीन सर्वसाधारण सभा घेतली जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)