शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

कृषी मंत्रालयाच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा

By admin | Published: November 05, 2016 8:36 PM

शेतक-यांसाठी राबवल्या जाणा-या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती व प्रशिक्षणासाठी नेमलेल्या दोन संस्थांनी कृषी मंत्रालयाची ८ लाख ९५ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे

ऑनलाइन लोकमत
दोन संस्थांचा समावेश : अनुदान घेऊन सादर केला नाही ताळेबंद 
पुणे, दि. 5 - शेतक-यांसाठी राबवल्या जाणा-या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती व प्रशिक्षणासाठी नेमलेल्या दोन संस्थांनी कृषी मंत्रालयाची ८ लाख ९५ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इन्स्टीट्युट ऑफ रेलिव्हंट रिसर्च (आयआरआर) या बाणेरमधील अनुदानित संस्थेसह नवी दिल्लीतील मेट्रीक कन्सलटन्सी लिमिटेड या संस्थांचा समावेश आहे. 
याप्रकरणी कृषी मंत्रालयातील वरिष्ठ टेक्निकल अधिकारी पुरुषोत्तम खियाराम राजानी (वय ५४, रा. श्रीनगर राणीबाग, दिल्ली, मुळ रा. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शेतक-यांना अंबा व द्राक्ष उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांच्याकडून चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही संस्थांशी ७ फेब्रुवारी १९९६ रोजी नवी दिल्लीमध्ये करार झाला होता. या कराराची मुदत ३१ मार्च १९९९ रोजी संपली आहे. 
या कंपनीचे मॅनेजिंग ट्रस्टी आणि रिसर्च संचालक डॉ. अमिता देशमुख आणि संचालक तसेच वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. आनंद करंदीकर आहेत. मंत्रालयाकडून वेळोवेळी या संस्थांना डीडीच्या माध्यमातून ८ लाख ९५5 हजार ५५० रुपये देण्यात आले होते. मंत्रालयाने घालून दिलेल्या अटीप्रमाणे आर्थिक उलाढालीचा तपशील तसेच वार्षिक ताळेबंद किंवा कोणत्याही प्रकारचा हिशोब विवरण पत्र (फायनल रिपोर्ट) तसेच आॅडीट युटिलायझेशन सर्टीफिकेट अद्यापपर्यंत सादर केले नाही. यासोबतच राज्यातील शेतक-यांसाठी अथवा फळ उत्पादकांसाठी दिलेल्या रकमेचा नक्की काय वापर केला याबाबतही त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. राज्यातील आंबा आणि द्राक्ष उत्पादीत करणा-या शेतक-यांना फळांच्या उत्पन्नासाठी व नवीन प्रजातीच्या निर्मितीसाठी आयआरआर या कंपनीस दिलेल्या रकमेचा अपहार करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर सन २००० ते २०११ या कालावधीत कृषी मंत्रालयाने दोन्ही संस्थांशी फोन व रजिस्टर पत्रांद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही. 
डॉ. देशमुख आणि डॉ. करंदीकर यांचे मेट्रीक कन्सलटन्सी हे कार्यालय बंद होते. तसेच पुण्यातील आयआरआरचेही कार्यालय बंद करण्यात आलेले होते. या दोघांशीही कोणताही संपर्क होत नसल्याने मंत्रालयाच्या अतिरीक्त सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजानी यांनी फिर्याद दाखल केली. पुढील तपास उपनिरीक्षक ए. आर. शिंदे करीत आहेत.