शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

घरकुलाचे कोट्यवधी अन्यत्र वळविले

By admin | Published: April 21, 2017 3:06 AM

रमाई घरकूल योजनेचे ४२ कोटी रुपये विधिमंडळाची परवानगी न घेता ब्लँकेट आणि सतरंज्यांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाने वापरले होते.

यदु जोशी , मुंबईरमाई घरकूल योजनेचे ४२ कोटी रुपये विधिमंडळाची परवानगी न घेता ब्लँकेट आणि सतरंज्यांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाने वापरले होते. त्यासाठी विधिमंडळाची परवानगी घेतलेली नव्हती. महालेखापालांनी घेतलेला हा आक्षेप विभागाने मान्य केला आहे. लोकलेखा समितीने मागविलेला महालेखापालांच्या आक्षेपावरचा अभिप्राय विभागाने समितीसमोर सादर केले असून, त्यावर नजर टाकली असता गैरव्यवहारांची कबुली विभागाने दिली असल्याचे स्पष्ट होते. आघाडी सरकारच्या काळात हे प्रकार घडले. घरकुलांसाठी असलेला निधी घरकूल लाभार्थ्यांसाठीचे ब्लँकेट आणि सतरंज्या खरेदी करण्यासाठी वापरणे नियमानुसार नव्हते, असे ताशेरे महालेखापालांनी ओढले होते. ३१ मार्च २०१२च्या आदेशानुसार ४ लाख ९७ हजार ७२४ ब्लँकेट आणि तेवढ्याच सतरंज्यांचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांची किंमत प्रत्येकी अनुक्रमे ५२२ रुपये आणि ३६९ रुपये इतकी होती. धक्कादायक म्हणजे ते ब्लँकेट आणि सतरंज्यांचे पूर्ण वाटप आज पाच वर्षांनंतरदेखील होऊ शकलेले नाही. नावाची पाटी १५२६ रु.नारमाई घरकूल योजनेच्या लाभार्थींच्या घरावर त्यांच्या नावाची जी पाटी लावण्यात आली ती तब्बल १५२६ रुपयांना खरेदी करण्यात आली. विभागाने ५० हजार पाट्या (७.६३ कोटी रु.) खरेदी करण्याचे कार्यादेश मे. गायो एंटरप्रायजेस; पुणे (२६ हजार पाट्या) आणि भारतीय शैक्षणिक साहित्य उत्पादक केंद्र अरण्येश्वर; पुणे (२४ हजार पाट्या) यांना दिले. तत्कालीन समाजकल्याण आयुक्त आर.के. गायकवाड यांनी या दोन्ही फर्मना प्रत्येकी ४० हजार पाट्या पुरविण्याचे काम आपल्या अधिकारात दिले. त्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक होते, अशी कबुली आता विभागाने दिली आहे. एकूण पाट्यांच्या खरेदीपोटी तब्बल १८.८६ कोटी रुपये अदा करण्यात आले. एकूण १ लाख २० हजार पाट्यांपैकी ५४ हजार १५३ पाट्या अद्याप बसविण्यातच आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली. याचा अर्थ घरे बांधलेली नसतानाही आधी पाट्या खरेदी करण्यात आली. शासनाचे पाट्या खरेदीचे उद्दिष्ट ५० हजार इतके असताना शासनाची परवानगी न घेता आणखी ८० हजार पाट्या खरेदी करण्यात आल्या. करारनाम्यातील अटीनुसार पाट्या घरावर लावल्यानंतर तसे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून प्राप्त झाल्यानंतर ९० टक्के रक्कम अदा करणे आवश्यक होते. मात्र, पुरवठादाराने माल पुरविल्याचे प्रमाणपत्र सहायक समाजकल्याण आयुक्तांनी दिल्यानंतर १०० टक्के रक्कम अदा केली.१०० टक्के रक्कम मिळाल्यानंतर संबंधित पुरवठादार यांच्याकडून पाट्या घरावर बसविल्याबाबतचे अहवाल सादर करण्यात आले. त्यांची छाननी केली असता एकूण ७५ हजार ८४८ पाट्या बसविण्यात आल्या असून त्यापैकी ग्रामसेवकांकडील प्रमाणपत्र १२ हजार ६२३ तर सरपंचांनी दिलेली प्रमाणपत्र ही ६३ हजार २२४ इतकी असल्याचे समोर आले. अटीनुसार केवळ ग्रामसेवकाचेच प्रमाणपत्र ग्राह्य ठरणार होते. सरपंचांनी दिलेली प्रमाणपत्रे ग्राह्य ठरत नाहीत. त्यामुळे येथे वित्तीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते, असा अभिप्राय सामाजिक न्याय विभागानेच दिला आहे. पाट्यांच्या खरेदीमध्ये अनियमितता झाली. जे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत असे स्वत: विभागाचा अहवालच सांगतो त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात तत्कालीन आयुक्त आर.के. गायकवाड, तत्कालीन उपसंचालक एच.आर. कांबळे, तत्कालीन उपसंचालक एस.एम. कांडलकर या तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहायक आयुक्त ए.एम. शेख यांनाही कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली असून, त्या सध्या सेवेत आहेत. प्रमुख लिपिक आर.जी. शेंडगे यांना निलंबित करण्यात आले आहे.