शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

By admin | Published: April 11, 2016 3:13 AM

येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला.

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला. तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. महापौर अश्विनी रामाणे व उपसरपंच दीपक तिवले यांनी गाळ काढण्याचे काम थोडा वेळ थांबवून पाट रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. चुनखडीच्या बांधकामातील दोन बाय दोन फूट लांबी-रुंदीचा अतिशय सुंदर घडण असलेला हा पाट आहे.तलावाच्या इतिहासात प्रथमच यंदा पाऊसमान कमी झाल्यामुळे कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे. यामुळे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंपदा विभागातर्फे तलावातील गाळ काढण्याचे काम गेले तीन आठवडे सुरू आहे. दुपारी पोकलँडच्या साहाय्याने गाळउपसा सुरू असताना, चालक कुमार गोरंबेकर यांना हा पाट दिसून आला. त्यांनी ही माहिती उपसरपंच दीपक तिवले यांना दिली. शाहूपूर्वकालीन असलेला हा पाट गाळाच्या खाली सात फूट ढिगाखाली होता. हा पाट आजही मजबूत व पाणी वाहून जाईल, असा आहे. त्यामध्ये पाणी होते. त्यास खापरी नळ योजना, असेही म्हटले जाते.जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी मंदिराच्या पिछाडीस अमृत, राम, परशुराम ही कुंडे आहेत. ज्यातील पाणी प्रदूषणविरहित असे. कोल्हापुरात १७६० मध्ये २१ तळी होती, पण नागरी प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नव्हते. रंकाळ््याचे पाणी पिण्यास चांगले होते, परंतु पूर्ण क्षमतेने शहरात पुरवठा करता येत नव्हता. पुण्याच्या बाबुराव केशव ठाकूर या व्यापाऱ्याची महालक्ष्मीवर श्रद्धा होती. शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन त्यांनी कात्यायनीतील कुंडातील हे पाणी पाटाद्वारे शहरात आणण्याची योजना आखली. तीन लाख रुपये खर्च करून हे पाणी नळावाटे महालक्ष्मी मंदिरातील दोन हौदात व शहरात ३२ विहिरींमध्ये सोडले होते. तोच हा पाट सापडल्याने अडीचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासास उजाळा मिळाला. तलावात पाट सापडल्याचे दुपारी गावात समजताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. पाट बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.घटनास्थळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आदींनी भेट दिली व पाटाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)