शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

जामोद येथे संचारबंदी चार तासांसाठी शिथिल

By admin | Published: April 19, 2016 2:36 AM

जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.

जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. सकाळी १0 ते १२ व त्यानंतर दुपारी ४ ते ६ अशी पुन्हा दोन तासांच्या टप्प्यातील शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नसून, गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संचारबंदी शिथिलतेच्या तासात ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार उरकले. जामोद येथे १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता; तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोमवारी चार तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी कायम ठेवली आहे. सध्या गावातील तणाव ओसरत असून, शांततेचे वातावरण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर हे परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जामोद येथे तळ ठोकून आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह २२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या दंगलप्रकरणी १११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ८७ आरोपींना अटक केली आहे. यापैकी २७ जणांना पोलीस कोठडी तर ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या सर्वांची रवानगी बुलडाणा येथील कारागृहात करण्यात आली आहे, तर पोलिसांनी गावातील काही जणांच्या घरातून देशी कट्टा, तलवारी असे प्राणघातक साहित्यसुद्धा जप्त केले आहे.