शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

"दादा आप आए बहार आयी है", हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, अजित पवारांना उद्देशून म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 7:54 AM

मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : मौजे सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी  २२ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण, मल्लिकार्जुन सेवा संस्थेचा अमृतमहोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाळ्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण पालकमंत्री झालो. तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला, नागरिकांनी सातत्याने पाठिंबा दिला, त्यामुळे आपण संकटातून सुखरूप बाहेर पडलो, अशा भावना व्यक्त करत असताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. 

याचबरोबर, "दादा आप आए बहार आयी है" असं म्हणत प्रोत्साहन पर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेने मला समजून घेतले, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 

अजितदादांनी आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. तीसुद्धा संधी दादांनी दिली. मला आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही - अजित पवारकोल्हापूर हे राष्ट्रवादी पक्षाचेवैचारिक केंद्र म्हणून ओळखले जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येते आणि जाते. कोणीही कायम सत्तेत राहण्याचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्हिजन असणारे नेते आहेत. तशा योजना चांदा ते बांधापर्यंत हव्यात. सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. यासाठी भाजप-शिवसेना सरकारमध्ये आम्ही सामील झालो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

याचबरोबर, विरोधी पक्षात असताना सरकारवर विकास कामांबाबत वजन पडत नाही, कामे होत नाहीत. जे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला नको आहेत ते प्रकल्प होणार नाहीत. वचनपूर्तीचे राजकारण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. मुश्रीफ यांनी आता जास्त वेळ कागलमध्ये न थांबता, त्यांनी व आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात फिरावे, असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर