शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"दादा आप आए बहार आयी है", हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, अजित पवारांना उद्देशून म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:04 IST

मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : मौजे सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी  २२ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण, मल्लिकार्जुन सेवा संस्थेचा अमृतमहोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाळ्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण पालकमंत्री झालो. तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला, नागरिकांनी सातत्याने पाठिंबा दिला, त्यामुळे आपण संकटातून सुखरूप बाहेर पडलो, अशा भावना व्यक्त करत असताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. 

याचबरोबर, "दादा आप आए बहार आयी है" असं म्हणत प्रोत्साहन पर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेने मला समजून घेतले, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 

अजितदादांनी आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. तीसुद्धा संधी दादांनी दिली. मला आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही - अजित पवारकोल्हापूर हे राष्ट्रवादी पक्षाचेवैचारिक केंद्र म्हणून ओळखले जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येते आणि जाते. कोणीही कायम सत्तेत राहण्याचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्हिजन असणारे नेते आहेत. तशा योजना चांदा ते बांधापर्यंत हव्यात. सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. यासाठी भाजप-शिवसेना सरकारमध्ये आम्ही सामील झालो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

याचबरोबर, विरोधी पक्षात असताना सरकारवर विकास कामांबाबत वजन पडत नाही, कामे होत नाहीत. जे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला नको आहेत ते प्रकल्प होणार नाहीत. वचनपूर्तीचे राजकारण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. मुश्रीफ यांनी आता जास्त वेळ कागलमध्ये न थांबता, त्यांनी व आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात फिरावे, असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर