शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

दिंडी चालली पुढे ...

By admin | Published: February 05, 2017 1:18 AM

हे संमेलन तर झालं. पावसाला पूर येतो, तेव्हा गाळ अणि राळ निघून जातो आणि राहते ते निर्मळ पाणी. समेलनाचं यश-अपयश मोजण्याच्या प्रत्येकाच्या पट्ट्या वेगळ््या असतील.

- रविप्रकाश कुलकर्णीहे संमेलन तर झालं. पावसाला पूर येतो, तेव्हा गाळ अणि राळ निघून जातो आणि राहते ते निर्मळ पाणी. समेलनाचं यश-अपयश मोजण्याच्या प्रत्येकाच्या पट्ट्या वेगळ््या असतील. ज्यांनी त्यांनी ते बघावं. अरे हो, अता पुढचं संमेलन आलचं की? पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. संमेलनाचा इतिहास तरी तेच सांगतो. होणार होणार असा गेले काही दिवस जो गाजावाजा होत होता ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज रविवार म्हणजे ५ फेब्रुवारी २०१७ रोजी अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे.एरवीदेखील डोंबिवली नगरी या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतेच. मात्र इथे भरलेल्या ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने ती आणखी प्रकाशझोतात आली आहे. ही किमया अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची हे निर्विवाद. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची गोष्टच वेगळी. ज्याचे पडसाद मराठी सांस्कृतिक जगतात ठळकपणे जाणवतात, विशेष म्हणजे ही परंपरा अखंडपणे गेली काही वर्षे चालू आहे आणि पुढेही चालू राहील असं दिसत आहे. याचं कारण म्हणजे साहित्य संमेलनाच्या सांगता दिवशी पुढचं साहित्य संमेलन ‘आम्हाला द्या’ असा पुढाकार घेणारे दिसतात. यंदा तर त्याच्या आधीच पुढचं संमेलन आम्ही भरवू सांगणारे भेटले.साहित्याची दिंडी ही अशीच पुढे जाणार आहे. त्याचीच ही खूण आहे. साहित्याच्या नावाने तीन दिवस वेगवेगळे आणि वेगवेगळ्या ठिकाणची माणसं एकत्र येतात. कमी-जास्त विचारविनिमय करतात ही गोष्ट आश्वासक वाटते. आज त्याची गरज आहे. हे पुन्हा डोंबिवलीच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे.या वेळचं संमेलन आगरी युथ फोरमच्या पुढाकाराने भरलं आहे, हेदेखील त्याचं वेगळेपण आहेच. शेवटी साहित्यातदेखील समाजातील वेगवेगळ्या थरातील मराठी स्तरातील लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, त्याचीच ही सुरुवात आहे, असं म्हटलं तर चुक ीचं ठरू नये!सुरुवातीला काही कुरबुरीदेखील झाल्या. पण आता या गोष्टीदेखील अपरिहार्यच समजायच्या का कुणास ठाऊक? महाराष्ट्र धर्माचंच हे अंग म्हणावं काय? एकेकाळचे खंदे कार्यकर्ते, समीक्षक, लेखक भीमराव कुलकर्णी यांनी हे मार्मिकपणे नमूद करून ठेवलं आहे. ते म्हणतात, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हो, असं मला विचारल्यास मी ‘मराठी परिषद आणि मराठी साहित्य संमेलनं’ असं चटकन सांगून टाकतो. संकटाने स्फुरण येतं, संघटनात्मक कार्य करायची खुमखुमी असतानाही कटकटी, कलागती, झोंबाझोंबी, कायद्याचा, घटनेचा कीस काढून, तावून सुलाखून निघाल्यानंतर संमेलनाच्या धुमधडाक्यात स्वत:ला झोकून देणं आणि तेथेही वेगवेगळ्या अंगाने आपल्यावरील गुणांचं प्रदर्शन करून झाल्यानंतर मग संमेलनाच्या यशस्वितेची चर्चा करून पुन्हा वाद उकरून काढणं...ही सारी साहित्य संमेलनाची वैशिष्ट्यं... म्हणजेच महाराष्ट्र धर्मया गोष्टीला आता तीसएक वर्षं झाली असती. पण या निरीक्षणात काहीही बदल करावासा वाटत नाही. बदल असलाच तर त्यात गडद रंगाचीच भर पडते.या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनसुद्धा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची दिंडी अव्याहत चालू आहे आणि चालू राहणार आहे. हे वेळोवेळी भरलेल्या संमेलनाने दाखवून दिलं आहे. डोंबिवली येथे भरलेल्या संमेलनाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं आहे!गेले काही दिवस डोंबिवलीतील कार्यकर्ते हे संमेलन व्हावं - यशस्वी व्हावं यासाठी झटत आहेत. शेवटी असल्या निरलस कार्यकर्त्यांमुळेच कार्यसिद्धी होत असते. याची जाण आजच्या संमेलनाच्या सांगतेवेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष, गुलाबराव वझे यांना आहे आणि त्याचा पुनरुच्चार ते करणारच हे वेगळे सांगायला नको.असल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच दिंडीबरोबर चालण्याचं बळ मिळत असतं. या दिंडीत आपल्यालाही सामील होता आलं हे समाधान पुढच्या वाटचालीत बळ देत असतं. संमेलनात एवढं झालं तरी पुष्कळ.म्हणूनच साहित्य संमेलनं व्हायला हवीत. हे डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सांगतेवेळी जाणवणार आहे, हेही नसे थोडके.