शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दुष्काळग्रस्तांची व्यथा : मराठवाड्यातील २६० कुटुंबे मुंबईच्या आश्रयाला

By admin | Published: April 28, 2016 2:26 AM

हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही; अशी अवस्था झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.

लीनल गावडे,

मुंबई- हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही; अशी अवस्था झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांनी मुंबईकडे धाव घेतली आहे. घाटकोपरमधल्या भटवाडी येथे तब्बल २६० दुष्काळग्रस्त कुटुंबे वास्तव्याला आली आहेत. रोजीरोटीसाठी त्यांची वणवण सुरू आहे. भटवाडी येथील महापालिका मैदान क्रमांक दोनमध्ये २६० कुटुंबांतील ८०० लोकांनी उघड्यावर संसार मांडले आहेत. नांदेड आणि लातूरमधून हे दुष्काळग्रस्त आले आहेत. मैदानाच्या परिसरात चिखल साचला आहे. दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरांमुळे समस्येत भर पडत आहे. गावी राहिलेल्या वयोवृद्धांची काळजी त्यांना सतावत आहे.बांबू, चादर आणि साड्यांच्या मदतीने झोपड्या उभारल्या आहेत. सामान साहित्य झोपडीबाहेर ठेवावे लागत आहे. मैदानात दिवे नाहीत. केवळ एक मोठा दिवा लावण्यात आला आहे. सामान चोरीला जाण्याची भीती आहे. शिवाय अंधारामुळे महिलांना असुरक्षित वाटत आहे. नैसर्गिक विधीसाठी काहीच व्यवस्था नाही. रोजगारच्या आशेने मुंबईत आलेल्या या लोंढ्यांच्या हाताला पुरेसे काम नाही. कधी शंभर रुपये मिळतात तर कधी ४००. ते पुरत नाहीत. गावीही पैसे पाठवावे लागतात. त्यामुळे दुष्काळग्रस्तांची अवस्था कैचीत अडकल्यासारखी झाली आहे.>गावाची आठवण येते....गावी शेती आहे. पण पाण्याअभावी शेतात धान्याचा दाणाही उगवलेला नाही. गावात चांगली घरे आहेत. मुंबईत अशा अवस्थेत राहावे लागते; याचे दु:ख आहे. घरची आठवण येते. वृद्धांना गावीच सोडून आलो आहे. त्यांची काळजी वाटते. पाऊस पडला की पुन्हा घरी जायचे आहे.- नागेश्री राठोड, सकनूर, नांदेड>‘शंभर रुपयांत आठवडा काढतो’दोन मुलींना सासूसोबत सोडून पतीसह मुंबईत आले आहे. रोजगार मिळत नाही. मुंबईत या मैदानावर गेल्या काही वर्षांपासून येत आहोत. येथे रोजगार मिळतो. पाणी मिळते. त्यामुळे दिवस जात आहेत. गाव ओस पडले आहे. रोजगार मिळत असला तरी १०० रुपयांमध्ये आठवडा काढावा लागतो. - अंजनबाई चव्हाण, बाराळी, ता. मुखेड, जिल्हा नांदेड>कुटुंबाचे भागते; पण...वेठबिगारी करुन घर चालवायचो. दुष्काळ भीषण आहे. इथे कधीकधी दिवसाला १५० तर कधी ४०० रुपये मिळतात. त्यात कुटुंबाचे भागते. शिवाय गावी जे आहेत; त्यांचीही जबाबदारी आहे.- देविदास राठोड, बाराळी, ता. मुखेड, जिल्हा नांदेड>महापालिकेने लक्ष द्यावे...मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांची व्यवस्था व्हावी म्हणून महापालिकेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहे. महापालिकेच्या अखत्यारित सुमारे १ हजार २०० शाळा असून, उन्हाळी सुटीमुळे त्या बंद आहेत. तिथे तात्पुरता निवारा मिळेल. शिवाय त्यांना अन्य मूलभूत सेवासुविधांचाही लाभ मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.