शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

डेंग्यूची २,७०७ रुग्णांना बाधा

By admin | Published: October 24, 2016 4:50 AM

गेल्या काही वर्षांत मुंबईत डेंग्यूने ठाण मांडले आहे. २०१३ ते २०१५ या कालावधीत डेंग्यूचे २ हजार ७०७ रुग्ण मुंबईत आढळून आले असून

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईत डेंग्यूने ठाण मांडले आहे. २०१३ ते २०१५ या कालावधीत डेंग्यूचे २ हजार ७०७ रुग्ण मुंबईत आढळून आले असून, त्यापैकी ३१ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. ई वॉर्डमध्ये गेल्या तीन वर्षांत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.२०१३मध्ये ई वॉर्डमध्ये डेंग्यूचे १०५ रुग्ण, २०१४मध्ये १३४ आणि २०१५मध्ये १२० रुग्ण आढळून आले होते. २०१३मध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. पण, २०१४मध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाचा ई वॉर्डमध्ये मृत्यू झाला होता.२०१३मध्ये आर उत्तर वॉर्डमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. तर, पी दक्षिण वॉर्डमध्ये २ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. २०१४मध्ये जी उत्तरमध्ये डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळून आले होते. तर, ए आणि के पूर्व वॉर्डमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. २०१५मध्ये ई वॉर्डच्या बरोबरीनेच जी उत्तर वॉर्डमध्येही डेंग्यूचे १२० रुग्ण आढळून आले होते. तर, एम पूर्व वॉर्डमध्ये २ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी काढलेल्या माहितीत उघड झाली आहे. २०१३मध्ये बी, जी दक्षिण, जी उत्तर, के पूर्व, एल, एन आणि टी वार्ड येथे प्रत्येकी एक असे ७ तर पी दक्षिण आणि एम पूर्व येथे प्रत्येकी दोन असे सर्व मिळून ११ डेंग्यूच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.