शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

By admin | Published: July 16, 2017 2:13 PM

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं. 1 येथील लक्ष्मीनगर येथे टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतउल्हासनगर, दि. 16 - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं. 1 येथील लक्ष्मीनगर येथे टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी आहेत. सैफुद्दीन खान आणि इस्लाम शेख हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, मागील दोन दिवसांपासून विदर्भातही पाऊसधारा सुरू झाल्या असून गडचिरोलीत अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरींवर सरी पडत आहेत. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार कायम आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी जायकवाडीतील नाथसागरात पाणीसाठा होऊ लागला आहे. मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. मुंबईकरांची तहान भागविणारा मोडक सागर तलाव भरुन वाहू लागला आहे. माळशेज घाटात दरडी कोसळत असल्याने पुढील दोन दिवस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून राधानगरीसह पाच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. कोकणात मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 जुलै रोजीही सर्वदूर मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस येथील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवरही बंदी घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.