शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर यावे - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 2:18 AM

पोलीस कोठडीतील मृत्यूंत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घट झाली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हे प्रमाण ‘शून्य’ असले पाहिजे

मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूंत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत घट झाली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हे प्रमाण ‘शून्य’ असले पाहिजे, असे म्हटले. तसेच किरकोळ गुन्ह्यातील आरोपींची शक्यतो रात्री चौकशी न करण्याची सूचनाही उच्च न्यालालयाने या वेळी केली. पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी इंडियन सेंटर फॉर ह्युमन राईट्सने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी मृत्यूबाबत उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. या अहवालानुसार, २०१५मध्ये १८ आरोपींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. तर २०१६मध्ये १० आणि २०१७च्या या दोन महिन्यांत एकही आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला नाही. पोलीस कोठडी मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र हे प्रमाण शून्यावर आले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले. तसेच किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींची शक्यतो रात्री चौकशी करू नका, अशीही सूचना या वेळी खंडपीठाने राज्य सरकारला केली. त्यावर सरकारी वकिलांनी खंडपीठाला असे निर्देश देऊ नका, अशी विनंती केली. ‘कधीकधी किरकोळ गुन्ह्यातील आरोपी मोठमोठ्या गुन्ह्यांबद्दल माहिती देतात. असे अनेक गुन्हे सांगण्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री चौकशी न करण्याचे निर्देश देऊ नयेत,’ अशी विनंती सरकारी वकिलांनी खंडपीठाला केली. तर खंडपीठाने हे निर्देश नसून केवळ सूचना आहे, असे स्पष्ट केले.दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी २६ जिल्ह्यांमधील सिव्हिल रुग्णालयात फॉरेन्सिक वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)