शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

नदीत बुडून आजोबांसह दोन नातवांचा मृत्यू

By admin | Published: January 24, 2016 8:38 PM

म्हारळ येथे उल्लास नदीत बुडून ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकालच्या वेळी घडली, मृता मध्ये आजोबासह २ नातवांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. २४ -  म्हारळ येथे उल्लास नदीत बुडून ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकालच्या वेळी घडली, मृता मध्ये आजोबासह २ नातवांचा समावेश आहे.  नदीपात्रात नातवंडे बुडत असल्याचे पाहून पोहता न येणाऱ्या आजोबांनीही नदीत उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरल्याने नातवांसह त्यांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कल्याणनजीक वरप गावात घडली. दीपनारायण सिंग (५४) यांच्यासह आयुष संजय सिंग (१२) आणि अर्जुन संजय सिंग (१०) अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत. उल्हासनगर येथील कमला नेहरूनगर धोबीघाट परिसरात राहणारे दीपनारायण हे नातवंडे आणि त्यांच्या मित्रांसमवेत सीमा रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेल्या उल्हास नदीकिनारी फिरायला गेले होते. या वेळी आयुष आणि अर्जुन हे दोन्ही सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र मनीष सिंग असे तिघे नदीपात्रात खेळायला उतरले. परंतु, पोहता येत नसल्याने ते तिघेही बुडू लागले. हा प्रकार नदीच्या काठावर बसलेल्या दीपनारायण यांनी पाहिला आणि त्यांनी तिघांना वाचविण्यासाठी स्वत: नदीत उडी घेतली. या वेळी काठावर असलेल्या शुभम सिंग यानेही त्यांच्यासोबत उडी मारली. मनीषला वाचविण्यात शुभमला यश आले. पण, त्यालाही पोहता येत नसल्याने त्याने अधिक धाडस न करता मदतीसाठी धावाधाव सुरू केली. त्यांच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. पण, तिघांनाही वाचविण्यात यश आले नाही. दीपनारायण यांनाही पोहता येत नसल्याने तेही बुडाले आणि नातवंडे तर वाचली नाहीतच, पण त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आजोबांनाही प्राण गमवावे लागले. अखेर तिघांचे मृतदेह बाहेर काढून ते उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची नोंद टिटवाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने कमला नेहरूनगर परिसरावर शोककळा पसरली. मरण पावलेले आयुष आणि अर्जुन हे दोघेही सेंच्युरी रेयॉन शाळेत अनुक्रमे सातवी आणि पाचवीत शिकत होते. विशेष सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामाला असलेले दीपनारायण यांनी नुकतीच म्हणजे १६ जानेवारीला स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.