शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

‘कर्जमाफी निव्वळ आकड्यांचा खेळ’

By admin | Published: June 28, 2017 2:08 AM

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या ८९ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचे वक्तव्य केले. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३६ लाखांचा आकडा दिला आहे. राज्य सरकारकडून येणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे भाजपाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मध्यावधीसाठी निर्णय -भाजपाच्या गोटातून मध्यावधीची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याची शंका आहे. मध्यावधीची घोषणा झाली तर काँग्रेस त्यासाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.संघाची भूमिका शेतकरीविरोधीच -संघ आणि भाजपाची भूमिका कायमच शेतकरीविरोधी राहिली आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नसला तरी तातडीचा उपाय आहे. चार वर्षांची कर्जमाफी घोषितकरून सरकारने दीर्घकालीन उपाय योजावेत, असे चव्हाण यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्यासंदर्भात सांगितले.