शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

शिवसेनेने सरकारला लाथा घातल्याने कर्जमाफी - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 13, 2017 8:03 AM

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावून शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही कर्जमाफी शिवसेनेमुळे शक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेच्या सक्रीय सहभागामुळे सरकारचा गळाच आवळला गेला. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. 
 
शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही असा अप्रत्यक्ष इशाराही सरकारला दिला आहे. 
 
आणखी वाचा 
 
कर्जमाफी देताना शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे असा उपरोधिक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!
 
- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास थांबले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून आम्ही त्यांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचे मनापासून आणि ‘तत्त्वतः’ अभिनंदन करीत आहोत. पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रोश केला. संप आणि बंदच्या दणक्यानंतर सरकारने दडपशाहीचे प्रकार केले तरी शेतकरी एक राहिला व हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव ठरला. नव्या ‘घोषणे’नुसार अल्पभूधारकांचे कर्ज तत्काळ माफ झाले आहे व सरसकट कर्जमाफीस ‘तत्त्वतः’ मान्यता देऊन सरकारने स्वतःच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवून घेतला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा संपूर्ण सहभाग होता. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले व ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘कॅबिनेट’वर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता. जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण असेच घेणार असाल तर तुमच्याशी आमचं जमणार नाही व तुमच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार. 
 
- आम्ही आता मुख्यमंत्र्यांचे फक्त एकाच गोष्टीसाठी अभिनंदन करीत आहोत ती म्हणजे कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न त्यांनी केला नाही. आता ‘कुणी’ याचा अर्थ ‘तत्त्वतः’ शिवसेना व इतर संघटना असाच घ्यायला हवा. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे. अर्थात सरकारने ही कर्जमाफी मोकळ्या मनाने व दिलदारीने दिलेली नाही. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याची ‘हमी’ काही आम्ही देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी अशी आम्ही त्यांना ‘तत्त्वतः’ विनंती करीत आहोत. 
 
- सरकारात एखादे काम रेंगाळत ठेवायचे असेल तर आयोग वगैरे नेमून त्यांच्या अहवालावर वर्षानुवर्षे धुळीचे थर साचवले जातात. तसे अनेकदा ‘तत्त्वतः’ या सरकारी शब्दप्रयोगाचे झाले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ‘तत्त्वतः’ शब्दाच्या रेशमी फासात अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात व उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. तत्त्वतः कर्जमाफीचे निकष सरकारने तत्काळ जाहीर करावेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचेही सातबारा कोरे करकरीत व्हावेत. शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळावा या मागणीचा रेटा आम्हाला सोडता येणार नाही. या आमच्या मागण्या तत्त्वतः नसून आरपारच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडास पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न झालाच तर गाठ शिवसेनेशीच आहे व शिवसेना आग्या वेताळाच्या भूमिकेत शिरून पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या-तोटय़ाचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!