शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

By admin | Published: April 02, 2017 1:29 AM

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे

पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षांना सामोरे जावे लागू शकते,असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पुण्यात केले.वन विभागातर्फे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जावडेकर यांनी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याबाबत सर्व राज्यांशी संवाद साधला. सुमारे २५ राज्यांनी त्यास होकार दर्शविला असून काही राज्यांनी त्यासंदर्भातील निर्णय स्वत:च घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,परीक्षा घेण्यासंदर्भातील कायदा केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. (प्रतिनिधी)