शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

तोंडी परीक्षेच्या निर्णयाला तोंड फुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:54 AM

भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा बंद करून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. मात्र या निर्णयाला सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी विरोध

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा बंद करून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. मात्र या निर्णयाला सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी विरोध केला असून या निर्णयामुळे दहावीच्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.सरकारने हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. बोरनारे म्हणाले की, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांचे वाचन, संभाषण, भाषण व श्रवण कौशल्य तपासले जातात व त्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात. सीबीएससी आणि विविध बोर्डाच्या परीक्षांमध्ये भाषा विषयांना अंतर्गत गुण दिले जातात. मग केवळ राज्य बोर्डातील विद्यार्थ्यांच्याच तोंडी परीक्षा का बंद केल्या जात आहेत, असा सवालही बोरनारे यांनी उपस्थित केला आहे.शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राज्य बोर्डाच्या शिक्षकांवर विश्वास नाही. त्यामुळे गुणांचा फुगवटा कमी करण्याच्या नावाखाली तावडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलचे माजी उपाध्यक्ष महादेव सुळे यांनीही शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. सुळे म्हणाले की, राज्य बोर्डाला एक नियम आणि इतर बोर्डांना दुसरा नियम असा भेदभाव करू नये. सरकारने हा निर्णय रद्द केला नाही, तर शिक्षकांना पालकांसोबत मिळून आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.