शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

दिवाळीला पोलीस ठाण्यांवर मोर्चे, राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार - शेतकरी कर्जमुक्ती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:20 AM

सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.

जळगाव : केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असून यात सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर मंगळवारी दुपारी ही परिषद पार पडली. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, सुकाणू समिती सदस्या सुशिला मोराणे, अशोक ढवळे, नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, एस.बी. पाटील आदी उपस्थित होते.शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलितनिवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन मोदी विसरले.एक चहावाला लाल किल्ल्यावर भाषण देतो, याचा कष्टकºयांना अभिमान वाटला, मात्र आता २०१९ नंतर मोदींना कधीही लाल किल्ल्यावर जाता येणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.सरकारविरुद्धचा कृती कार्यक्रमबलिप्रतिपदेला राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतकरी मोर्चे, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचे श्राद्ध घालणे तसेच२० नोव्हेंबर रोजी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिल्लीत धडक देण्याचीही घोषणा परिषदेत करण्यात आली.सरकार सर्व आश्वासने विसरून चुकीचे निर्णय घेत असल्याने शेतकºयांसह अभियंते, अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. येथे कोणालाच ‘अच्छे दिन’ नसून तीन वर्षात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित असल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी