शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

राज्यात ‘डीएड’ला उतरती कळा

By admin | Published: July 22, 2016 8:13 PM

डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर

- विजय सरवदे

औरंगाबाद, दि.22 -  डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पाठ डी.एड. कॉलेजकडे फिरवली असून शेकडो कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, यंदा ९ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती; पण लगेच काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, दोन महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया स्थगित आहे.
सन २०१० पर्यंत डी.एड. कॉलेजेससाठी सुगीचे दिवस होते. डी.एड.ला प्रवेश घेण्यासाठी वारेमाप डोनेशन दिले जायचे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंब्बड उडायची. २०१० नंतर मात्र हे चित्र पालटले. २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधी शिक्षकांची भरती राबविण्यात आलीच नाही. कधी काळी नोकरीची हमखास हमी असणारे डी.एड. कॉलेजेस आता मात्र बेरोजगारांची फौज तयार करणारे कारखाने झाले आहेत. पूर्वीची डी.एड. व आताची डी.टी.एड. पदविका घेणारे लाखो तरुण सध्या बेरोजगार आहेत. गेल्या वर्षी तर मराठवाड्यातील प्रवेशाच्या ३ हजार जागांपैकी तब्बल दोन हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. अवघे ३० टक्के  झाले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी डी.एड. कॉलेजेसकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यभरातील अनेक अध्यापक पदविका महाविद्यालये दिवसेंदिवसविद्यार्थ्यांनी ओस पडत चालली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८९ डी.एड. कॉलेजेसपैकी ५० टक्के कॉलेजेस अर्थात ४२ कॉलेजेस सध्या तग धरुन आहेत. 
राज्यात ११०० डी.एड. कॉलेजेस होती. त्यापैकी १९ शासकीय अध्यापक पदविका महाविद्यालय, तर १०० ते १२५ अनुदानित महाविद्यालये आहेत. उर्वरित ७०० ते ८०० विना अनुदानित डी.एड. महाविद्यलयांपैकी ५० टक्केच्या वर महाविद्यालये चालविणे शक्य नसल्यामुळे संस्थाचालकांनी आपली महाविद्यालयेच बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. भोपाळ येथील ‘एनसीईटी’ याच संस्थेला डी.एड. महाविद्यालय सुरू करण्याचे आणि बंद करण्याचेही अधिकार आहेत. ‘एनसीईटी’कडून महाविद्यालय बंद करण्यास परवानगी मिळालेली नसल्यामुळे संस्थाचालक आणि तेथे काम करत असलेले एम.एड.धारक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
 
आयडीयल बॅचलाही मिळेना विद्यार्थी

 

जिल्हास्तरीय ‘डायट’ अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ५० विद्यार्थ्यांची एक ‘डीएड आयडीयल’ बॅच असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो. तज्ज्ञ शिक्षकांकडून या बॅच मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते; पण गेल्या तीन वर्षांपासून ‘डायट’ मधील ‘आयडीयल’ बॅचसाठीदेखिल विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे ‘डायट’च्या मनुष्यबळाचा वापर आता जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वापरले जाणार आहे. राज्यातील जवळपास ३५ ‘डायट’ची सारखीच अवस्था आहे.