शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
3
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
4
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
5
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
6
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
7
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
8
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
9
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
10
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
11
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
12
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
13
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
14
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
15
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
16
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
17
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात हा दिला उमेदवार
18
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
19
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

कारवाईनंतरही घर सोडण्यास नकार

By admin | Published: June 25, 2014 1:53 AM

वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांचे वीज, पाणी आणि गॅस तोडल्यानंतरही रहिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत.

मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांचे वीज, पाणी आणि गॅस तोडल्यानंतरही रहिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत. वीज, पाणी नसलेल्या घरांतच मुक्काम ठोकणारे रहिवासी ‘घर सोडून जायचे  कुठे,’ असा सवाल विचारत आहेत.
पटेल अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहणारे शहा कुटुंब आजही घराचा ताबा सोडण्याच्या तयारीत नव्हते. काल वीज कापल्यानंतर आज पाणीपुरवठाही खंडित केल्याचे शहा कुटुंबातील युवक अंकित याने सांगितले. तो म्हणाला, ‘घरातील महत्त्वाचे सामान याआधीच नातेवाइकांकडे हलवले आहे. तरीही घराचा ताबा सोडणार नाही. तात्पुरते जेवणाची आणि इतर प्रात:विधीची सोयही नातेवाइकांकडे केली आहे.’   घरात सामान नसले, तरी मिडटाऊन अपार्टमेंटच्या 19व्या मजल्यावरील श्रीनिवास कुटुंबाने रात्रीचे जेवण घरीच करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीनिवास यांचा नोकर मेहेशचंद्र आर्या वीज, पाण्याविनाच रात्रीचे जेवण तयार करण्यात व्यस्त होता. मूळचा उत्तराखंडचा असलेला आर्या गेल्या 1क् वर्षापासून श्रीनिवास यांच्याकडे काम करीत असल्याचे सांगत होता. तो म्हणाला, ‘घरी 14 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. महाप्रलयामुळे गावाकडे जाऊ शकत नाही. आज घर तुटणार असल्याचे कळत असले तरी मालकांनी काम सोडून जाण्यास सांगितले नाही. आज रात्रीचे जेवण तयार करण्यास सांगितल्याने त्याचीच तयारी करीत आहे. उद्या काय करायचे, हे अजूनही माहीत नाही.’  (प्रतिनिधी)
 
च्मंगळवारी दिवसभर पालिका, बेस्ट आणि महानगर गॅसचे कर्मचारी आपली कारवाई करत होते. कम्पाउंडमध्येही नीरव शांतता होती. इमारतीबाहेरून पाचव्या मजल्यावरील पाइपलाइन कापत कर्मचारी अनधिकृत घरांमधील गॅसपुरवठा खंडित करत होते. अनधिकृत घरांचा गॅसपुरवठा तत्काळ खंडित केला असला, तरी घरांतील मीटर मात्र घरांच्या चाव्या मिळाल्यानंतरच काढणार असल्याचे एका अधिका:याने सांगितले. दिवसभर 9क् घरांचा वीज, 47 घरांचा गॅस आणि 25 घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.