शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:16 IST

बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. त्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  

मुंबई - बदलापूरातील आदर्श विद्या मंदिरात झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता. या प्रकारात झालेली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली. 

मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये यासाठी आजच वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती करताना खबरदारी, तक्रार पेटी, सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं पालन, विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करणे. अशी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य यांच्यावरही कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील. स्थानिक अधिकारी तिथे प्रशासक असतील. संस्थेला अपील करायचे असेल तर त्यांना उत्तर देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेतंय. कुठल्याही संस्थेवर प्रशासक लागू होणे ही मोठी शिक्षा असते. सखी सावित्री हा मुलांच्या सुरक्षेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून मुलांची छळवणूक न होता शिक्षणाचा दर्जा कसा वाढवला जाईल याचे सविस्तर वर्णन या योजनेत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याची असल्याने सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, अधिकारी यांना यात कुठलीही कमतरता येणार नाही याचे आदेश दिले आहेत असंही केसरकर म्हणाले. 

दरम्यान, हा प्रकार करणारे लोक मानसिक विकृतीचे असतात. ही विकृती ठेचली पाहिजे. आपण कितीही सुरक्षा ठेवली तरी अशी विकृत माणसं समाजात आहेत त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने फास्टट्रॅक कोर्ट, शक्ती कायदा लवकरात लवकर आणणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १२ हजार मुले आज त्या शाळेत शिकतात. त्याठिकाणी सातत्याने मोर्चे आणायचे. त्या मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे. ही कुठली निती आहे?, आरोपीला पकडलं आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. मात्र शाळा व्यवस्थित सुरू झाली पाहिजे त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी. आज त्याठिकाणी आंदोलन करणारे हे राजकीय लोक आहेत ते बाहेरून येतायेत हेही लक्षात घेतले पाहिजे. हे प्रकरण पेटत ठेवून त्यातून राजकीय लाभ घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असं सांगत दीपक केसरकरांनी विरोधकांवर निशाणा साधला.  

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षण