शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 5:02 PM

बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. त्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  

मुंबई - बदलापूरातील आदर्श विद्या मंदिरात झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता. या प्रकारात झालेली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली. 

मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये यासाठी आजच वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती करताना खबरदारी, तक्रार पेटी, सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं पालन, विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करणे. अशी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य यांच्यावरही कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील. स्थानिक अधिकारी तिथे प्रशासक असतील. संस्थेला अपील करायचे असेल तर त्यांना उत्तर देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेतंय. कुठल्याही संस्थेवर प्रशासक लागू होणे ही मोठी शिक्षा असते. सखी सावित्री हा मुलांच्या सुरक्षेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून मुलांची छळवणूक न होता शिक्षणाचा दर्जा कसा वाढवला जाईल याचे सविस्तर वर्णन या योजनेत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याची असल्याने सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, अधिकारी यांना यात कुठलीही कमतरता येणार नाही याचे आदेश दिले आहेत असंही केसरकर म्हणाले. 

दरम्यान, हा प्रकार करणारे लोक मानसिक विकृतीचे असतात. ही विकृती ठेचली पाहिजे. आपण कितीही सुरक्षा ठेवली तरी अशी विकृत माणसं समाजात आहेत त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने फास्टट्रॅक कोर्ट, शक्ती कायदा लवकरात लवकर आणणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १२ हजार मुले आज त्या शाळेत शिकतात. त्याठिकाणी सातत्याने मोर्चे आणायचे. त्या मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे. ही कुठली निती आहे?, आरोपीला पकडलं आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. मात्र शाळा व्यवस्थित सुरू झाली पाहिजे त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी. आज त्याठिकाणी आंदोलन करणारे हे राजकीय लोक आहेत ते बाहेरून येतायेत हेही लक्षात घेतले पाहिजे. हे प्रकरण पेटत ठेवून त्यातून राजकीय लाभ घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असं सांगत दीपक केसरकरांनी विरोधकांवर निशाणा साधला.  

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षण