शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 2:12 PM

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. याच दरम्यान आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जयदीप आपटेला कोणी काम दिलं होतं? असा प्रश्न विचारला असता केसरकरांनी त्यावर उत्तर दिलं आहे. "एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, त्याकडे बघितलं पाहिजे. चूक, अपघात घडू शकतात, पण महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं ते नेव्हीच्या फ्लॅगवर अभिमानाने फडकतं" असं केसरकरांनी म्हटलं आहे. 

मालवणमध्ये नवीन पुतळा बसवण्यासाठीची प्रक्रिया कशी असेल याबाबतही दीपक केसरकर यांनी माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांनी मालवणमधील प्रकरणाबाबत तीन बैठका घेतल्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार उपस्थित होते, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जात आहे. भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, परिसराचा ही विकास केला जाणार आहे" असं केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

 "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे...", शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "मला इतकं दुखं होतंय की हे सांगताहेत ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभे आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज