शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

जंगलतोडीमुळे कोसळताहेत दरडी

By admin | Published: July 20, 2015 1:44 AM

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक

सचिन लुंगसे, मुंबईग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक घटनांमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी वेगाने जाणाऱ्या वाहनांचे हादरेही अशा दरडींना बसतात. त्यामुळे अशा घटना वाढतच राहतात, असेही पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटले आहे.मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटजवळ रविवारी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत असून, या घटनांशी बिघडणाऱ्या नैसर्गिक असमतोलाचा संबंध पर्यावरण तज्ज्ञांनी जोडला आहे.पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दरडी कोसळण्याच्या घटनांना येथील जंगलतोड आणि डोंगरतोड कारणीभूत आहे. जंगलतोड झाल्यानंतर मूळांनी धरून ठेवलेली माती विस्कळीत होते. ती मुख्य प्रवाहापासून तोडली जाते. जेव्हा विकासकामे म्हणजे रस्त्यांसाठी काटकोनात डोंगर तोडले जातात, तेव्हा डोंगरांची यंत्रणा खिळखिळी होते. डोंगर अथवा दरडीमध्ये भेगा निर्माण होतात. त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरते. शिवाय अशा दरडी अथवा डोंगरांवर उन्हाचाही परिणाम होत असतो. पावसासह उन्हाच्या माऱ्यामुळे खडकावरील मातीचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे खडक उघडा पडतो. अशा अनेक कारणांनी डोंगराची अथवा दरडीची यंत्रणा खिळखिळी झाली, की त्या आपोआप कोसळू लागतात. कोकणातील दरडी वारंवार कोसळण्यामागेही हीच कारणे आहेत.